डावीकडे मच्थिंद्रगड आणि उजवीकडे गोरखगड किल्ला |
स्वप्नेश, फरहान आणि मी |
दोन डोंगरांच्या मधून जाणारी आहूपे घाटाची वाट |
सिध्दगड किल्ल्याचे माचीवर असणारे घनदाट झाडीत लपलेले प्रवेशद्वार |
भगवान चिले लिखित गडकोट पुस्तकाच्या आधारे किल्ल्याचा शास्त्रशुध्द पद्धतीने अभ्यास करण्याचा केलेला प्रयत्न डावीकडून वर गेलेली बालेकिल्ल्याकडे जाणारी वाट |
किल्ल्याच्या माचीवर असणारे सिध्दगड गाव |
गडाच्या बालेकिल्ल्यावरुन दिसणारी भिमाशंकर पर्वतरांग आणि पदरगड |
बालेकिल्ल्यावरील नंदी आणि शिवलिंग |
गडाच्या शिखरावरुन अर्थात बालेकिल्ल्यावरुन दिसणारा परिसर |
गडाचा बालेकिल्ला |
बालेकिल्ल्यावर येण्यासाठीचे प्रवेशद्वार |
शिखरावरुन दिसणारा संपूर्ण कोकण परिसर, गोरखगड, पुढे धुरक्यात हरवलेला कसारा |
एका बाईने सकाळचा उरलेला भात आणि सुकी भाजी दिली. खुप दमलो होतो त्यामुळे ते शिळे जेवणसुध्दा गोड लागत होते. अंगात थोडी उर्जा आली आणि निघालो. पण थोडच पूढे गेलो असू आणि त्या अंधारात आमची टॉर्च लप लप करु लागली. म्हणजे ती सुध्दा कधीही दगा देऊ शकत होती. आता त्या घनदाट काळोख्या जंगलातून आधीच निशाचर प्राण्या पक्षांचे आवाज येत होते, त्या हरीश्चंद्रगड आणि भिमाशंकर अशा दोन अभयारण्याच्या मधे आम्ही होतो, जिथे बिबट्यांचा आणि रानडुक्करांचा सुध्दा वावर आहे. तिथून जाणे हे मोठे आव्हान म्हणण्यापेक्षा एक जोखीम होती. जी आम्ही दोघांनी एकमताने फेटाळली. तिथे दोघांनी घेतलेला तो सुज्ञ निर्णय कोणत्याही काळी योग्यच वाटतो. तिथल्या गावकऱ्यांनी आम्हाला ती रात्र गावातच मुक्काम करण्याचा आग्रह केला. आयुष्यात पहिल्यांदा घरी काहीही न कळवता आम्ही त्या १५-२० घरांची वस्ती असलेल्या सिद्धगडमाची या आदिवासी गावात अनपेक्षित मुक्काम केला. रात्रीचे जेवणसुध्दा तिथेच जेवलो. जेवण झाल्यावर आम्ही त्या गावात रात्रीचे बिनचंद्राचे पडलेले असंख्य चांदणे पाहत होतो. ते दृश्य शहरात तर पाहायला मिळत नाहीच पण गावीसुध्दा हल्ली रात्रीच्या दिव्यांचा उजेड खुप झाल्याने त्या प्रकाशात काळोखाचे हे सौंदर्य पाहायला नाही मिळत. तिथल्या एका झोपडीत आम्ही गेलो. तिथे एक आज्जीबाई अंधाऱ्या घरात फक्त एका दिव्याच्या आधारे राहत होती. तिच्यापाशी बसून तिच्याशी बोलू लागलो तिचं ऐकू लागलो आणि माझं मन हळवं झालं. तिने सांगितलेली तिची कहाणी अजुनही माझ्या लक्षात आहे. डोंगरदऱ्यात राहणाऱ्या या आदिवासींबद्दल खुप कळवळा वाटतो.
गावातल्या त्या लोकांनी आम्हाला त्यांच्या पडवीत राहायला जागा दिली. खाली आंथरायला आणि वर पांघरायला गोधडी दिली. पण रात्रभर त्या पडवीत असलेल्या बकऱ्या आणि कोंबड्यांच्या आवाजाने रात्रभर झोप नाही लागली. पण झोपताना दिवसभरात चुकलेल्या वाटा, त्यामुळे झालेला त्रास, किल्ल्यावर पाहिलेला सूर्यास्त आणि परतत असताना पाहिलेले भयाण जंगल आणि आमच्या मनातील या सगळ्यांना सामोरे जात असताना चालू असलेली धाकधूक हे सर्व आठवत होतं. सलग दोन किल्ले मागे न हटता हट्टाने केल्याचा आनंदही आहेच आणि त्या आज्जीची मनात छापली गेलेली प्रतिमा. शिवाय अनोळखी माणसांच्या घरी बिनधास्त अथवा सावध आश्रयाला राहणे मनात घर करुन राहते. पुढच्या सकाळी त्यांच्या घरी चहा पिऊन त्यांचे आभार मानून निघालो. खाली उतरल्यावर मागे वळून पाहिलं तेव्हा सूर्योदयात सिद्धगड न्हाऊन निघाला होता. जाताना अंगावर अनुभवाची रकसॅक घेऊन दोघे परतीच्या दिशेने निघालो.
सुकलेला झरा, सिध्दगड माची आणि वर अवघड सिध्दगड |
टिप्पण्या